Loading ...
/* Dont copy */

गांधी जयंती (सण-उत्सव)

गांधी जयंती (सण-उत्सव) - गांधी जयंती हा दिवस महात्मा गांधी प्रति जागतिक स्तरावर सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो (Gandhi Jayanti).

गांधी जयंती (सण-उत्सव)

गांधी जयंती म्हणजे जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीचा जन्म दिवस


गांधी जयंती (सण-उत्सव)

(Gandhi Jayanti) जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीचा आज जन्म दिवस. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो.



गांधी जयंती म्हणजे जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीचा जन्म दिवस. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय ‘अहिंसा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. माहात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६१ साली गूजरात मधील पोरबंदर शहरात झाला. गांधीजीच्या वडिलांचे नाव करमचंद तर आइचे नाव पुतळाबाई होते. वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा कस्तुरबा माखनवाला यांच्याबरोबर बालविवाह झाला. शालेय शिक्षण संपवून वयाच्या १९व्या वर्षी १८८८ मध्ये गांधीजी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. गांधीजी आणि कस्तुरबा यांना चार मुले झाली. हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास.

महात्मा ही उपाधि...


‘रवींद्रनाथ ठाकूर’ यांनी सर्वप्रथम गांधीजींना महात्मा ही उपाधि दिली. महात्मा या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे महान आत्मा. लोक गांधीजीना बापूजी ही म्हणत. १९४४ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले. अंहिसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. त्यानंतर १९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारण मधील शेताकऱ्यांना जुलमी कर आणि जमिनदार यांच्याविरोधात एकत्र करुन लढा दिला.

त्यांनतर गांधीजीनी दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधिरित आंदोलांनी ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले. गांधीजीनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा नुसताच पुरस्कार केला नाही तर ते स्व:त ती तत्वं जगले. स्वदेशीचा आग्रह धरत त्यांनी ब्रिटिश कपड्यांना विरोध केला आणि खादीचा पुरस्कार केला. गांधीजी चरख्यावर स्वत: सूत कातत.

गांधीजींची हत्या...


३० जानेवारी १९४८ साली गांधीजींची हत्या करण्यात आली. दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून फिरत असताना ‘नथुराम गोडसे’ या युवकाने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. आणि एका युगपुरूषाचा अंत झाला.

गांधीजींवर गोळ्या झाडणारा नथुराम हा प्रतिगामी विचारसरणीचा होता. त्याचे संबधं जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. त्याचे मते पाकिस्तानला पैसे देऊन भाराताला दुबळे बनविण्यास गांधीजींच जवाबदार होते. गांधीजींच्या राज घाट येथील समाधीवर ‘हे राम’ हे शब्द लिहलेले आहे. अनेकांच्या मते त्यांचे हे अखेरचे शब्द होते.

गांधी जयंती’ हा दिवस महात्मा गांधी प्रति जागतिक स्तरावर सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो.

- स्वप्नाली अभंग

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची