Loading ...
/* Dont copy */

जीवनातील स्वाभिमान आणि आत्मसन्मान

मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिका श्रीमती चैताली गिते यांचा जीवनातील स्वाभिमान आणि आत्मसन्मान हा मराठी लेख.

जीवनातील स्वाभिमान आणि आत्मसन्मान (चैताली गिते)

मानवी व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत स्वाभिमान आणि आत्मसन्मान या दोन मूल्यांची भूमिका स्पष्ट करणारा चिंतनात्मक लेख...

जीवनातील स्वाभिमान आणि आत्मसन्मान

चैताली गिते (नाशिक, महाराष्ट्र)

प्रस्तावना
मानवी जीवनाचे खरे मोल बाह्य यशात नसून अंतःकरणातील मूल्यांमध्ये असते. स्वाभिमान आणि आत्मसन्मान ही अशी दोन मूल्ये आहेत जी व्यक्तीच्या जीवनाला दिशा, स्थैर्य आणि अर्थ देतात. व्यक्ती स्वतःकडे कशा दृष्टीने पाहते आणि आपल्या भावनांचा किती आदर करते, यावर तिच्या जीवनाची गुणवत्ता ठरते. त्यामुळे या दोन संकल्पनांचा सूक्ष्म अर्थ समजून घेणे आवश्यक ठरते.

मानवाच्या व्यक्तिमत्त्वाचे मोल त्याच्या संपत्तीवर, पदावर किंवा प्रसिद्धीवर ठरत नाही; ते ठरते स्वतःकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर. मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे स्वाभिमान आणि आत्मसन्मान होय. प्रतिष्ठा ही बाह्य गोष्ट असली, तरी स्वतःबद्दलची आदरभावना अंतःकरणाशी निगडित असते. स्वाभिमान आणि आत्मसन्मान हे दोन शब्द अनेकदा समान अर्थाने वापरले जातात; परंतु त्यांच्या आशयात सूक्ष्म फरक आहे. हा फरक समजून घेतल्यास जीवन अधिक सुदृढ, संतुलित आणि अर्थपूर्ण बनते. ज्या व्यक्तीच्या मनात स्वतःबद्दल आदर असतो, ती व्यक्ती कोणत्याही संकटात सहज डगमगत नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवून जगणे. स्वतःची ओळख, कर्तृत्व आणि तत्त्वांवर ठाम राहणे म्हणजे स्वाभिमान. तो अहंकार नसतो; तो आपल्या अस्तित्वाचा सन्मान असतो. स्वाभिमानी व्यक्ती कधीही चुकीच्या मार्गाने यश मिळविण्याचा प्रयत्न करत नाही. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी परकीय सत्तेसमोर शरण न जाता स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या जीवनातून स्वाभिमान, धैर्य आणि नीतिमत्तेचे महत्त्व अधोरेखित होते. स्वाभिमान म्हणजे आपल्या मूल्यांची, संस्कारांची आणि तत्त्वांची जाणीव ठाम ठेवून जगणे होय. तो व्यक्तीच्या सामाजिक स्थानावर अवलंबून नसतो; तो तिच्या अंतर्मनातून निर्माण होतो. मानवी जीवनातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे आत्मसन्मान. आत्मसन्मान म्हणजे स्वतःच्या भावनांचा आणि विचारांचा आदर करणे. इतरांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला हरवून न टाकता आपल्या योग्यतेनुसार निर्णय घेणे म्हणजे आत्मसन्मान. जीवनात अनेकदा आपण इतरांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या भावनांना दाबतो किंवा त्यांना योग्य अभिव्यक्ती देत नाही. सतत इतरांचा विचार करत राहिल्यास व्यक्ती हळूहळू आपला आत्मसन्मान गमावू लागते. ज्या व्यक्तीमध्ये “नाही” म्हणण्याची ताकद नसते, तिचा आत्मसन्मान कमी असतो. आत्मसन्मान असलेली व्यक्ती आवश्यक तेथे ठामपणे “नाही” म्हणू शकते आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करते. कधी कधी भावनांचा अतिरेकी ताण आल्यामुळे आपण स्वतःचा आत्मसन्मान हरवून बसतो आणि चुकीच्या गोष्टींनाही होकार देतो. नातेसंबंध अधिक प्रामाणिक आणि दृढ व्हावेत, यासाठी आत्मसन्मान अत्यावश्यक असतो. कारण असे नाते स्वार्थावर नव्हे, तर परस्पर आदरावर आधारित असते. परंतु आजच्या जीवनात एकमेकांशी तुलना करण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते. तुलना करणे ही आत्मसन्मानाच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी आहे—तिची विचारशक्ती, क्षमता आणि जीवनदृष्टीही वेगळी असते. म्हणूनच आपण स्वतःची तुलना इतरांशी करू नये. आपल्या आयुष्यात स्वाभिमान आणि आत्मसन्मान या दोन्ही मूल्यांचा समतोल साधला, तर जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनते. ही दोन्ही मूल्ये व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणून जीवन जगताना या दोन्ही गोष्टींना योग्य स्थान द्यावे—आत्मसन्मानाने जगा आणि स्वाभिमानाने जगा.

संपादकीय विश्लेषण
या लेखात मानवी जीवनातील दोन मूलभूत मूल्यांचा—स्वाभिमान आणि आत्मसन्मान—विचारशील आणि नैतिक दृष्टिकोनातून वेध घेतला आहे. लेखकाने व्यक्तिमत्त्वाची खरी उंची बाह्य यशात नसून अंतर्मनातील मूल्यांमध्ये असते, ही भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. व्यक्तीच्या आत्मदृष्टीचा आणि तिच्या भावनिक स्वातंत्र्याचा जीवनावर होणारा परिणाम लेखात प्रभावीपणे अधोरेखित केला आहे. लेखात स्वाभिमान आणि आत्मसन्मान या दोन संकल्पनांतील सूक्ष्म भेद स्पष्ट करण्याचा प्रयत्न दिसून येतो. स्वाभिमानाला मूल्यांशी निष्ठा आणि तत्त्वनिष्ठ जीवनाशी जोडले आहे, तर आत्मसन्मानाला भावनिक स्वायत्तता आणि स्वतःच्या भावनांचा आदर करण्याशी जोडले आहे. या दोन संकल्पनांचा परस्पर संबंध दाखवताना जीवनातील संतुलनाचा विचार पुढे येतो. इतिहासातील प्रेरणादायी संदर्भाद्वारे स्वाभिमानाची संकल्पना अधिक प्रभावीपणे स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर आधुनिक जीवनातील तुलना, सामाजिक अपेक्षा आणि भावनिक दबाव या घटकांमुळे आत्मसन्मान कसा कमी होतो, यावरही लेख प्रकाश टाकतो. त्यामुळे लेख वैयक्तिक जीवनशैली आणि नैतिक विचार या दोन्ही स्तरांवर संवाद साधतो. संपूर्ण लेखाचा आशय मूल्याधिष्ठित जीवनाची जाणीव करून देणारा आहे. स्वाभिमान आणि आत्मसन्मान या दोन मूल्यांचा संतुलित संगम साधल्यास व्यक्ती अधिक स्थिर, प्रामाणिक आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकते, हा लेखाचा मुख्य संदेश आहे. सारांश: स्वाभिमान आणि आत्मसन्मान या दोन मूल्यांचा समतोल साधल्यास व्यक्तिमत्त्व दृढ होते आणि जीवन अधिक अर्थपूर्ण व संतुलित बनते.
हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)
अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

जागतिक महिला दिन (८ मार्च)
जागतिक महिला दिन (८ मार्च)
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची