एका लिहिलेल्या ओळीच्या, शेवटाला काय लिहावे, भावनांचे अश्रू सारे, शब्द व्यर्थ होऊन जावे
एका लिहिलेल्या ओळीच्याशेवटाला काय लिहावे ?
भावनांचे अश्रू सारे
शब्द व्यर्थ होऊन जावे
जाणिवांची चोरदारे
त्यातून संवेदनाच यावी
एका लिहिलेल्या ओळीच्या
पुढे ओळ नवी लिहावी
कोऱ्या कागदाची व्यथा
ऐकून जराशी घ्यावी
टाकाने अश्रू ढाळावे
कविता नवी सुचावी
बोलण्यासारखे न आता
माझे काही उरावे
माझे मलाच नकळत
मी काव्य असे रचावे