Loading ...
/* Dont copy */

मदनगड किल्ला

मदनगड किल्ला - [Madangad Fort] ४९०० फूट उंचीचा मदनगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील मदनगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो.

मदनगड किल्ला - Madangad Fort

सह्याद्री मधील कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड

मदनगड किल्ला - [Madangad Fort] ४९०० फूट उंचीचा मदनगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील मदनगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. सह्याद्री मधील कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड. किल्ला तसा बराच प्राचीन आहे. आणि तेवढाच दुर्गम सुद्धा. या परिसरातील भटकंती करायाची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी.

मदनगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा सुद्धा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. अलंग, कुलंग, छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई, डांग्या सुळका, हरिहर, त्रिंबकगड हे किल्ले दिसतात. गडफेरीस अर्धातास पुरतो.

मदनगड गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.

आंबेवाडी मार्गे: मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा-घोटी-पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारन ३२ कि.मी. चे अंतर आहे. घोटीवरून पहाटे आंबेवाडी ला ६ वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात.

गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यावर एक सरळसोट ५० फूट उंचीचा सुळका कडा लागतो.

घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर: किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.

गडावर राहण्यासाठी एक गुहा आहे. यात साधारण ३० जण राहू शकतात. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर फक्त फेब्रुवारी पर्यंत पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते. इतर वेळी स्वतः सोय करावी लागते. गडावर जाण्यासाठी आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.

सूचना: किल्ल्यावर जाण्याची वाट अतिकठिण असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची