Loading ...
/* Dont copy */

नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या)

नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या) - श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी.

नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या)

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी...

नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी

मराठीमाती संपादक मंडळ

आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणं नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? वारूळात जी नागांची नागकुळा होती, त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली.

काही वेळानं नागीण आली, आपलं वारूळ पाहू लागली, तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली, तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याचे घरी गेली. मुलांबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजणं मरून पडली.

पुढं तिला असं समजलं की, ह्यांची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागीण, नऊ नागकुळं काढली आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली.

दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागीण उभी राहिली. तिला म्हणू लागली, “बाई बाई तू कोण आहेत? तुझी आईबाप कुठं आहेत?” इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहाते तो प्रत्यक्ष नागीण दृष्टीस पडली. बाई बिचारी भिऊ लागली. नागीण म्हणाली. “भिऊं नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे.” तिनं आपली सर्व हकीकत सांगितली, ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं.

ती मनात म्हणाली, “ही आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही.” असं म्हणून सांगितली, तिनं ते ऐकली, वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं, ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला.

बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हां बापानं विचारलं, “हे व्रत कसं करावं?” मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की, “इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये. भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये. नागोबाला नमस्कार करावा.” असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला.

जशी नागीण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो, ही साठा उत्तराची नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: किती दुष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली, तर तो संतुष्ट झाल्यावाचून राहाणार नाही.

श्रावणातल्या कहाण्या यासंबंधी महत्त्वाचे दुवे:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची