Loading ...
/* Dont copy */

आयुष्यातली नाती अन् नात्यांचं आयुष्य - ब्र (सायली कुलकर्णी)

मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिका डॉ.सायली कुलकर्णी यांचा ‘आयुष्यातली नाती अन् नात्यांचं आयुष्य’ हा ‘ब्र’ या विभागातील संपादकीय लेख.

आयुष्यातली नाती अन् नात्यांचं आयुष्य - ब्र (डॉ.सायली कुलकर्णी)

माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात... आयुष्यातली नाती अन् नात्यांचं आयुष्य

आयुष्यातली नाती अन् नात्यांचं आयुष्य

सायली कुलकर्णी (पुणे, महाराष्ट्र)

‘We ignore those who want us... Want those who ignore us... Love those who hurt us and hurt those who love us.’ किती खरंय हे...! सगळ्यांचंच थोड्याफार प्रमाणात असंच होतंय. नात्यातला गुंता वाढतोय... की आपण वाढवतोय? नाती वाढवतोय आणि गुंताही. नात्याची संकल्पनाच स्पष्ट नाहीये तर ती जपणं, जोपासणं, टिकवणं कसं जमणार?

व. पु. म्हणतात, “माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतूपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात.” पटतं हे. एका काहीतरी निमित्ताने आपण एकत्र येतो. त्यामागे नियतीचा काहीतरी उद्देश असतो. तो साध्य झाला की आपण निघून जाणंच अपेक्षित असतं. हा स्वार्थ नसतो. माणसांकडून आपण अपेक्षा ठेववायच्याच नसतात. त्या नियतीनं ठेवायच्या. त्यांच्या पूर्तीनंतर माणूस माणसाला केवळ ओळखीपुरता ओळखतो.

मला तर असं वाटतं प्रत्येक गोष्टीचं ठराविक असं आयुष्य असतं. माणसाचं असतं, औषधांचं असतं. तसंच नात्यांचं असतं. पण मन किंवा मेंदू या नात्यांच्या आयुष्याला ठिगळं लावत बसतात अन् मग गुंता वाढत जातो. नाती टिकवण्याच्या शक्यता पडताळल्या जातात आणि माणसं भरडली जातात.

आयुष्याचे संदर्भ बदलत जातात तशी आयुष्यातली माणसं पण. नवीन दिवस, नवीन विचार, नवीन व्यक्ती, नवी नाती. पुन्हा नवीन दिवस येणारच असतो. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवी नाती तयार होत जातात. तर काही नात्यांचं स्वरुप बदलत जातं.

शाश्वत असं काही नसतंच. नाती तरी त्याला कशी अपवाद असतील? पण पुसली जाणार म्हणून रांगोळी न काढता राहतो का? अडकून राहिलो की गुंता वाढतो अन् गुंत्यात अडकत जातो. तिथला घास संपला की रेंगाळू नये आणि जाणार्‍याला अडवण्याचा अट्टहासही करु नये. माणसं ‘टाळायची’ नाहीत फक्त कोणती नाती ‘कवटाळायची’ हे ओळखायला शिकावं. माणसं आपल्याला घडवतात, शिकवतात, ती जोडण्याइतकंच ती जपणं - जोपासणं महत्वाचं असतं... कारण ती तितक्याच सहजतेनं दुरावतात.

शेवटी कसंय... ‘गोतावळा’ हवासा वाटतो, ‘पसारा’ नकोसा...!

सायली कुलकर्णी यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची