Loading ...
/* Dont copy */

शिळासप्तमीची कहाणी

शिळासप्तमीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Shilasaptamichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - शिळासप्तमीची कहाणी.

शिळासप्तमीची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Shilasaptamichi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - शिळासप्तमीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गाव वसवला. जवळ तळं बांधलं. काही केल्या पाणी लागेना. जलदेवतांची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. “राजा, राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे. पाणी लागेल.” हे राजानं ऐकलं. घरी आला. मनी विचार केला, फार दुःखी झाला. पुष्कळ लोकांच्या जिवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही. पण ही गोष्ट घडते कशी? सून कबूल होईल कशी? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरी पाठवावं, मुलगा ठेवून घ्यावा. सासऱ्यानं आज्ञा केली, सून माहेरी गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊ माखू घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेविला. जलदेवता प्रसन्न झाल्या, तळ्याला महापूर पाणी आलं. पुढं राजाची सून माहेराहून येऊ लागली. भावाला बरोबर घेतलं. मामंजींनी बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली; वशाची आठवण झाली.

तो वसा काय? तळ्याच्या पाळी जावं, त्याची पूजा करावी. काकडीचं पान घ्यावं. वर दहीभात आणि लोणचं घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि वाण भावाला द्यावं. एक मुटकुळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतांची प्रार्थना करावी. “जय देवी आई माते, आमच्या वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील ते आम्हास परत मिळोत.” याप्रमाणं तळ्यात उभं राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केल्यावर बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला. पाय कोण ओढतो म्हणून पाहू लागली, तो तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं त्याला कडेवर घेतलं. आश्चर्य करू लागली. सासरी येऊ लागली. राजाला कळलं. सून आपल्या वडील मुलासह येत आहे. राजाला आश्चर्य वाटलं. त्यानं तिचे पाय धरले. तिला विचारलं, “अगं अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला, तो परत कसा आला?” “मी शिळासप्तमीचा वसा केला, तळ्यात वाण दिलं, जलदेवतांची प्रार्थना केली. मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं.” राजाला फार आनंद झाला. तिच्यावर अधिक ममता करू लागला.

जश्या तिला जलदेवता प्रसन्न झाल्या, तशा तुम्हा आम्हा होवोत. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवाब्राह्मणांचे द्वारी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: दुसऱ्याच्या कल्याणाकरिता केलेले कोणतेही कृत्य फुकट जात नाही. त्यातूनही परोपकारासाठी जो आपल्या अत्यंत आवडत्या वस्तूचाही त्याग करतो, त्याला देव शेवटी आनंदातच ठेवतो.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची