वादळानं त्रस्त झालेला, तहानलेला तो किनार, आशाळभूत पणे, सागराकडं पहात होता
वादळानं त्रस्त झालेलातहानलेला तो किनार
आशाळभूत पणे
सागराकडं पहात होता
त्याला वाटत होतं
आपल्यालाही त्या लाटांची
सामावून घ्यावं...
तहानलेल्या मनाला
तृप्त करावं...!
आपल्याच मस्तीस बेभान
झालेलं ते पाणी...
किनाऱ्याकडं न येता
उंच उंच लाटात
बुडून गेलं होतं...!
तो किनारा...
तसाच कोरडा
वादळ झेलत उभा असताना
नागमोडी वळणं घेत
ती सरिता आली
सागराच्या किनाऱ्याला
तृप्त करूनच,
सागरात सामावली
सागराच्या खारट पाण्यापेक्षा
सरितेच्या अमृत जलाने
न्हाऊन निघालेला किनारा
तृप्त झाला