Loading ...
/* Dont copy */

रंगमंच, संयम आणि प्रेक्षक—जबाबदारी नेमकी कुणाची?

मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे नोंदणीकृत सभासद लेखक अमरश्री वाघ यांचा ‘रंगमंच, संयम आणि प्रेक्षक—जबाबदारी नेमकी कुणाची?’ हा मराठी लेख.

रंगमंच, संयम आणि प्रेक्षक—जबाबदारी नेमकी कुणाची? - अमुक-धमुक (अमरश्री वाघ)

रंगभूमीवरील शिस्त आणि संयम या दोन्हींची जबाबदारी कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात नेमकी कशी विभागली जाते, याचा शोध घेणारा लेख...

रंगमंच, संयम आणि प्रेक्षक—जबाबदारी नेमकी कुणाची?

अमरश्री वाघ (महाराष्ट्र, भारत)

प्रस्तावना
अलीकडील एका नाट्यप्रयोगात घडलेल्या प्रसंगाने रंगभूमीवरील शिस्त, संयम आणि व्यावसायिकतेबाबत महत्त्वाची चर्चा पुन्हा एकदा समोर आणली आहे. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील नात्याची मर्यादा, अपेक्षा आणि परस्पर जबाबदाऱ्या यांचा विचार करण्याची ही योग्य वेळ ठरते.

अलीकडे एका नाट्यप्रयोगादरम्यान घडलेली घटना रंगभूमीवर चर्चेचा विषय ठरली आहे. कलाकार अस्ताद काळे यांनी प्रयोग सुरू असताना मोबाईल वाजल्यामुळे एका प्रेक्षकाला थेट सुनावले आणि “एवढंच असेल तर तुम्हीच येऊन प्रयोग करा” असा टोमणा मारला. ही घटना वरकरणी क्षुल्लक वाटली तरी तिच्या माध्यमातून एक मोठा प्रश्न समोर येतो—रंगमंचावर संयम आणि शिस्त राखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? नाटक सुरू असताना मोबाईल सायलेंट ठेवणे ही प्रेक्षकांची प्राथमिक जबाबदारी आहे, यात कोणताही वाद नाही. रंगमंचावर कलाकार जीव ओतून काम करत असतात आणि अशा छोट्या व्यत्ययामुळे त्यांच्या अभिनयाच्या लयीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रेक्षकांची चूक स्पष्टपणे मान्य करावी लागते. मात्र, याच वेळी कलाकारांच्या प्रतिक्रियेवरही प्रश्न उपस्थित होतो. रंगमंचावर उभा असलेला कलाकार केवळ संवाद सादर करत नसतो, तर तो त्या क्षणी कलेचे प्रतिनिधित्व करत असतो. अशा परिस्थितीत संवाद थांबवून प्रेक्षकाला झापणे आणि उपरोधिक भाष्य करणे हे व्यावसायिकतेपेक्षा अहंकाराचे प्रदर्शन वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात आणखी एक अनुभव लक्षवेधी ठरतो. कल्याण येथील अत्रे रंगमंदिरात नुकत्याच पाहिलेल्या एका प्रयोगादरम्यान एका लहान मुलाच्या रडण्यावर कलाकार शंकरशन कऱ्हाडे यांनी टाकलेला कटाक्ष पाहायला मिळाला. त्या क्षणी संबंधित आईने घाईघाईने बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत रंगमंचाबाहेर धाव घेतली. या घटनेतून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो—नाट्यगृहांची जबाबदारी काय? लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, ‘क्राय रूम’ किंवा कुटुंबांसाठी अनुकूल सुविधा उपलब्ध आहेत का? जर अशा सुविधा उपलब्ध नसतील, तर प्रत्येक वेळी प्रेक्षकांनाच दोष देणे कितपत योग्य ठरेल? रंगमंच हा जिवंत कलेचा प्रकार आहे. येथे अनपेक्षित घटना घडणे अपरिहार्य आहे. अशा वेळी कलाकाराने संयम राखून प्रसंग हाताळणे हीच त्याच्या कलेची खरी कसोटी ठरते. त्याचप्रमाणे प्रेक्षकांनीही शिस्त पाळणे आवश्यक आहे. मात्र “तुम्हीच येऊन करा” अशा प्रकारची प्रतिक्रिया कलेतील श्रेष्ठत्वाचा सूर दर्शवते. कला ही लोकांसाठी असते, लोकांवर उपकार म्हणून नाही. प्रेक्षकांशिवाय रंगमंचाचे अस्तित्वच अर्थहीन ठरते, हे विसरता कामा नये. मोबाईलचा रिंगटोन काही क्षणांत थांबतो; परंतु अहंकाराचा प्रतिध्वनी दीर्घकाळ ऐकू येत राहतो. त्यामुळेच रंगमंचावर कलाकार मोठा असला तरी मनाने मोठेपणा जपणे अधिक महत्त्वाचे ठरते. शेवटी प्रश्न एवढाच— प्रेक्षकांनी मोबाईल सायलेंट ठेवावा, हे जितके आवश्यक आहे, तितकेच कलाकारांनी ‘अहंकार’ सायलेंट ठेवणेही गरजेचे आहे. तेव्हाच नाटक खऱ्या अर्थाने पूर्ण होते—रंगमंचावरही आणि समाजाच्या मनातही.

संपादकीय विश्लेषण
‘रंगमंच, संयम आणि प्रेक्षक—जबाबदारी नेमकी कुणाची?’ या लेखात मांडलेला मुद्दा अत्यंत समतोल आणि विचारप्रवर्तक आहे. लेखकाने एखाद्या एकतर्फी भूमिकेऐवजी कलाकार आणि प्रेक्षक या दोन्ही घटकांच्या जबाबदाऱ्यांचा सूक्ष्म विचार केला आहे. त्यामुळे लेख केवळ प्रतिक्रियात्मक न राहता विश्लेषणात्मक बनतो. रंगभूमीवरील शिस्त ही केवळ नियमांपुरती मर्यादित नसून ती सांस्कृतिक भानाशी जोडलेली आहे, हे लेखातून प्रकर्षाने जाणवते. लेखाची एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे घटनांचे निवेदन आणि त्यावर केलेले संतुलित भाष्य. प्रेक्षकांच्या चुकीची स्पष्ट कबुली देतानाच कलाकारांच्या प्रतिक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्याची भूमिका लेखाला बौद्धिक प्रामाणिकता देते. त्यामुळे वाचकाला विचार करण्याची जागा मिळते, जी संपादकीय लेखनाची खरी ताकद असते. नाट्यगृहांच्या सुविधांबाबत उपस्थित केलेला प्रश्न हा लेखाचा विस्तार वाढवतो. यामुळे चर्चेचा केंद्रबिंदू केवळ व्यक्तींवर न राहता व्यवस्थात्मक पातळीवर पोहोचतो. ही दृष्टी लेखाला व्यापक सामाजिक संदर्भ प्रदान करते आणि समस्येचे बहुआयामी स्वरूप स्पष्ट करते. भाषाशैली साधी, नेमकी आणि प्रभावी आहे. शेवटचा विचार—अहंकार आणि संयम यांचा तुलनात्मक संदर्भ—हा लेखाला भावनिक आणि तात्त्विक उंची देतो. त्यामुळे लेख वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा ठरतो. सारांश: रंगमंचावर शिस्त तेवढीच महत्त्वाची जितकी संयमाची जाणीव—दोन्हींचा समतोल राखल्यावरच कलेचे खरे सौंदर्य खुलते.
हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)
अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची