Loading ...
/* Dont copy */

न्हावीगड किल्ला

न्हावीगड किल्ला - [Nhavigad Fort] ४१०० फूट उंचीचा न्हावीगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण डोंगररांगेतील न्हावीगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

न्हावीगड किल्ला - Nhavigad Fort

न्हावीगड किल्ल्याला रतनगड असे देखील म्हणतात

न्हावीगड किल्ला - [Nhavigad Fort] ४१०० फूट उंचीचा न्हावीगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण डोंगररांगेतील न्हावीगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते.

उत्तरेकडून सुरू होणाऱ्या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत तर दुसऱ्या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.

न्हावीगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


न्हावीगड किल्ल्याला रतनगड असे देखील म्हणतात. गडावर जाण्याच्या वाटेवर पिण्याच्या पाण्याची टाकी आणि देवीचे एक मंदिर लागते. गडावर जातांना आपल्याला पायऱ्या तर लागतात पण दरवाज्याचा मात्र मागमूसही नाही. किल्ल्याचा माथा तसा निमुळताच आहे. गडावर पाण्याची तीन ते चार टाकी आहेत. घरांचे काही अवशेष सापडतात. गडाचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडावरून मांगीतुंगी, मुल्हेर, मोरागड, साल्हेर आणि हरगड हा परिसर दिसतो.

न्हावीगड गडावर जाण्याच्या वाटा


वडाखेल मार्गे: न्हावीगडावर जाण्यासाठी ताहाराबाद मार्गे मांगीतुंगी गाव गाठावे. मांगीतुंगी गावातून १ तासाच्या चालीने वडाखेल गावात यावे. वडाखेलपर्यंत डांबरी रस्ता नाही. त्यामुळे पायीच त्रेधातिरपीट करावी लागते. वडालेखमधून पाताळवाडीकडे कूच करावे. पाताळवाडी हे पायथ्याचे गाव आहे. वडाखेल ते पाताळवाडी हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. पाताळवाडीतून एक सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे. या पठारावरून दोन वाटा फुटतात. एक वाट समोर नाकाडावरून वर चढते. ही वाट थोडी कठीण आहे.

वाटेने वर चढताना सोपं प्रस्तरारोहण करावे लागते. वाटेने वर चढल्यावर आपण पायऱ्यांशी पोहोचतो. दुसरी वाट पठारावरून डावीकडे वळसा घालून पायऱ्यापाशी जाते. या वाटेला पाण्याची दोन-तीन टाकी लागतात. गडावर जाणाऱ्या पायऱ्या मात्र जपूनच चढाव्या लागतात. पायऱ्यावर माती साचल्याने घसरण्याची शक्यता फार आहे. पाताळवाडीपासून गडावर दीड तासात पोहोचता येते.

गडावर राहण्याची सोय नाही. गडावर जेवणाची सोय नाही. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी पाताळवाडी गावातून दीड तास लागतो. गडावर जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोंबर ते एप्रिल पर्यंत आहे.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची