हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.पुण्याहून रायगडला जाण्यासाठी दुपारी १:३० वाजता बस आहे. ती आपल्याला थेट किल्ल्याच्या पायथ्याशी खूबलढा बुरुजापाशी घेऊन जाते. महाडहून देखील रायगडसाठी दिवसातून तीन वेळा बस आहे. खूबलढा बुरूजापासून पायऱ्या चढावयास सुरुअवार करुन रमत रमत गेले तरी दोन तासात आपण गडावर पोहोचतो. ज्यांना चालण्याचे श्रम नको आहेत, अशांसाठी “जोग कन्स्ट्रक्शनने” रोप वे ची सोय केलेली आहे.
किल्ल्याच्या मुक्कामासाठी जिल्हा परिषदेच्या खोल्या आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बंगले आहेत. भोजनाची व्यवस्था देशमुखांचे उपहारगृह आणि म.प.वि.मं. चे कॅंटीन येथे होऊ शकते. जिल्हा परिशःअदेच्या खोल्यांपाशीच एका मोठ्या फलकावर गडाचे मानचित्र चितारलेले आहे. त्याचा संदर्भ घेऊन संपूर्ण गड फिरणे अवघड नाही. अथवा गो. नी. दांडेकरांचे “शिवतीर्थ रायगड” हे माहिती पुस्तक देशमुखांच्या उपहार गृहात उपलब्ध आहे. राजसभा, टकमक टोक, बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, हिरकणी बुरुज अशा नामवंत ठिकाणांव्यतिरिक्त, भवानी टोक अशी ठिकाणेही बघण्यास विसरु नका. ...अधिक वाचा