चूक की बरोबर? (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक अंकुश पवार यांचा चूक की बरोबर? हा मराठी लेख.

आपल्या समाजाला चूक की बरोबर याचे उत्तर स्वतःला साक्षी ठेवून देता आले तर...
चूक की बरोबर?
अंकुश पवार (ठाणे, महाराष्ट्र)
या लेखात सर्वाचे स्वागत!
खूप दिवसानंतर डोळे उघडे करुन झोपलेल्या आपल्या समाजाला चूक की बरोबर याचे उत्तर स्वतःला साक्षी ठेवून देता आले तर पुढची आपली पिढी ही सुशिक्षित, वैचारिक व स्वावलंबी तयार होईल.
तर माझ्या मराठीमाती डॉट कॉम या संकेतस्थळावरील सर्व प्रेक्षकांना हा लेख वाचून चूक की बरोबर? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला मिळेल अशी अपेक्षा ठेवून लेखाला सुरवात करतो...
अनेक वर्षापासून जुनं ते सोनं हे शब्द आपण वारंवार ऐकतो, परंतु सन १९५० ते १९९० या कालखंडातील आपल्या घरातील जेष्ठांना तसेच १९९० ते अलिकडे २०१० पर्यंत चा काळातील आपल्या तरुण पिढीला आताच्या आधुनिक AI च्या काळात सुध्दा जुना काळच समाधानी, सुखसोयी कमी पण माणसातली माणुसकी जगण्याची मजा ही होती असे राहुन राहुन वाटते. आता ही समाधानी पिढी आहे परंतु आधुनिकतेच्या नावाखाली चालेला थिल्लरपणा नकोसा वाटतो. चूक की बरोबर?
जुन्या काळात प्रत्येक समाजापुढे समस्या होत्या पण जगण्याची हिंमत व जगण्याची मजा ही त्या काळात वेगळीच होती. त्या काळातील शिक्षण व्यवस्था मुलांना पोटभरुन मार पण आयुष्यात पुढे जाण्याची शिस्त लावत होती. त्यावेळेची ग्रामीण व्यवस्था गावची सकाळ संध्याकाळ स्वर्गाहुन कमी नव्हती अन् जुन्या काळातली गाणी ऐकताना स्वर्ग सुखाची अनुभुती प्रत्येक क्षणाला देत होती. चूक की बरोबर?
त्यावेळी भ्रष्टाचार, दुष्कळ, उपासमारी, अशिक्षित समाज, बेरोजगारी सर्व समस्या समाजापुढे उभ्या होत्या परंतु त्यावेळचा माणुस खंबीर होता, समस्येवर मात करणारा होता; म्हणुनच त्यावेळेची सुपरहिट गाणी अजुनही तितकी लोकप्रिय आहेत व त्यावेळचे कलाकार ही आताच्या काळात सुद्धा त्याच ताकतीने काम करीत आहेत. त्यांची लोकप्रियता कमी नाही कारण त्यावेळी समाजातील प्रत्येक घटक हा आपआपल्या मर्यादेत होता. त्याने आपली पातळी कधीच सोडली नव्हती. चूक की बरोबर?
आता आधुनिकतेच्या नावाखाली प्रत्येक घटक अश्लिलतेची मर्यादा वारंवार ओलांडत आहे मग ती चित्रपटातून असोत किंवा गाण्यांतून असो, फरक इतकाच आहे त्यावेळच्या मुलांपेक्षा आजकालची मुलं ही अॅडव्हान्स आहेत. त्यांना सांगण्याची गरज जास्त पडत नाही. त्यांची अनुकरण क्षमता दांडगी आहे. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारची गाणी - सिनेमे बनवतो आहोत, कोणती भाषा, कोणते विषय वारंवार समाजात मुलांसमोर सातत्याने मांडत आहोत याची जाण, विसर आपल्या अती शहाण्या स्वयंघोषित पालकांनी करायला हवा. चूक की बरोबर?
कारण हीच पिढी आपला वारसा पुढे नेणार आहे. त्यांनाच आपण अंधारी भविष्यात ढकलत आहोत हे आपल्या बंद डोळयांना कधी दिसणार काय माहित? मला तर वाटतं, बरं झालं! कोरोना आला. त्याने आपली लायकी आपल्याला दाखवली. किती कमावले, किती शहणपणा केला तरी निसर्गापुढे मानव हा शून्यच आहे कारण हतबल होऊन लाखो करोडो कमावणारे तडफडून मेले. कमावलेले पैसे इथेच राहिले. ग्रामीण भागाला सोडून कधी परत न येण्याच्या शपथा खाणारे अति शहाणे कोरोना काळात गावकऱ्यांनी गावात घेतेले नाही म्हणून शेतात राहुन भाकरी चटणी खाउन राहिले, तरी अजूनही आपला माज उतरत नाही काय? चूक की बरोबर?
जुन्या काळात आपल्या भाव भावकीत मतभेद होते, जमिनीची भांडणे होती, वेळ जावा म्हणुन गप्पा मारायला राजकारण विषय हेाता म्हणून आपले पुर्वज सुखी होते. आपण जास्त शिकलो. आपण राजकारण आपल्या घरात आणले. राजकारणी लोकांना दादा, ताई, भाऊ, युवा नेते अशी संबोधने देऊन आपल्याच लोकांना गरजेपेक्षा जास्त किंमत दिली. त्यांनीच घराणेशाहीच्या प्रेमापोटी समाजा - समाजात जाती - पातीत राजकारण घालून प्रत्येक समाजात दरी निर्माण केली. स्वतःच्या परिवाराला सात जन्म बसून खातील इतके कमावून ठेवले, तेही आपल्या कष्टाच्या जीवावर. चूक की बरोबर?
आता तर आपली पुढची पिढी हयांचीच गुलाम होईल अशी चिन्ह दिसू लागली आहेत. राजकारणी लोकांनी मतांच्या हाव्यापोटी किती लोकांना आपल्या उरावर घेउन प्रगतीचे विकासाच्या नावाखाली बाहेरील लोकांना आश्रय दिला आहे की पुढच्या ४० वर्षात आपल्या राज्यातील लोकांची मतांसाठी देखील गरज या लोकांना लागणार नाही, अशी परिस्थिती येणार आहे. चूक की बरोबर? कारण इतर राज्यांतील लोकांची संख्या त्यांचे नगरसेवक, आमदार, खासदार, अशिक्षित सामजसेवकांचा सुळसुळाट प्रचंड प्रमाणात वाढला आहे की आपण आपल्याच राज्यात आहोत का असा प्रश्न बाहेर पडला की येतो? चूक की बरोबर?
गेल्याकाळात आंदोलन, सभा, मोर्चा म्हणला की अंगावर काटा यायचा. आता सर्व गोष्टीत चमकोगीरी पुढे येते. आंदोलन, मोर्चा यांच्या राजकीय साहेबांच्या मर्जीनुसार सकाळी ११ वाजता सुरु ५ वाजता बंद होतात. सामान्य जनतेचे प्रश्न आहे तिथेच राहतात. चूक की बरोबर? या आधी आपले सण म्हणले की महिना आधी आपण तयारी करायचो. दिवाळी, दसरा, होळी, दहिहंडी अगदी आतुरतेने वाट पहायचो. आपण आता राजकारण्यांना त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त किंमत मिळाल्यामुळे सर्व गोष्टी आपल्या सोयीनुसार वेगळया केल्या. आता प्रत्येक चैकात वेगळा गणपती, वेगळी देवी, वेगळा दसरा, बाळगोपाळांचा उत्सव, दहीहंडी आता हाय प्रोफाइल खेळ बनला आहे, अनेक लोक लाखो करोडो त्यातून कमावतात, बाळ गोपाळयांचा सण हे उद्दीष्ट निघून गेलं आहे. चूक की बरोबर?
गेल्या महिन्यात श्री राम नवमी जोशात आपण साजरी केली परंतु डोळयासमोरील चित्र पाहुन माझीच मला लाज वाटली. कुठे चालली ही सुक्षिक्षित अडाणी लोकांची वाटचाल. नक्कीच बाहेरील अतिक्रमण राहुदया, आपल्या लोकांमुळे हिंदु धर्म संस्कृती धोक्यात आली की काय वाटु लागले कारण राम नवमी ला काही प्रसिध्द देवळातले अपवाद वगळता बाकी सर्व ठिकाणी मोठमोठाले रामनवमी च्या शुभेच्छा बॅनर ११ वाजता उठुन श्री रामावर उपकार केल्यासारखे आजच्या पिढीची बाईक रॅली रात्री ७ नंतर मोठया डिजे समोर “जय श्री राम”, “भारत का बच्चा बच्चा बोलेगा” सुरवात झालेली अति उत्साही हिंदुची मिरवणुक डिजेच्या प्रचंड आवाजात “मै हु डॉन”, “एकच वादा राजु दादा” अशा गाण्याने संपली. मला इतकेच सांगायचे की प्रत्येक सणात राजकारण आणण्याची गरज नाही. सण सणासारखा करावा. चूक की बरोबर?
अशा वागण्यातून आपल्या पुढच्या पिढीला आपण काय बनवत आहोत, सुशिक्षत की राजकारणी? लोकांच्या पुढच्या पिढीचे अघोषित गुलाम जे आपल्या बापाप्रमाणे कर्जाच्या डोंगराखाली आयुष्य काढुन मरुन जातील. चूक की बरोबर?
सध्या तर काय प्रत्येक चौकात दर रविवारी कोण तरी आलतू फालतू दादा उठतो, प्रिमिअर क्रिकेट लिग आयोजित करतो. कबडी स्पर्धा असे अनेक खेळ सुरु करतो. वाईट यात काहीच नाही पण सध्या नोकरीचा प्रश्न गंभीर आहे. सरकार जी परीक्षा निघेल ती होईलच असे नाही. घोटाळा इतर गोष्टी समोर येतात. आपली मुलं नक्की कुठल्या दिशेने वाहत चालली आहेत हे प्रत्येक पालकांने वेळ काढुन लक्ष देण्याची वेळ आली आहे. आपल्या ८ वी ते १० च्या मुलांना अजून मराठी वाचता येत नाही, लिहणं तर दुरच. जरा घ्या अभ्यास. समजेल किती पाण्यात आहोत आपण आणी आपली मुलं. आपण फक्त पैशाच्या मागे धावतो, कर्जाच्या डोगराखाली मरतो पण वेळ निघुन गेली तर इतके आयुष्य भर मरमर करुन आपला शेवटचा प्रवास वृद्धाश्रमापासून सु्रु होणार, आपली मुलं वैचारिक आर्थिक गुलाम म्हणुन आपण डोळ्यांनी पाहणार हे भविष्य येणार्या काळात दिसते आहे. चूक की बरोबर?
म्हणून जुना काळ बरा होता. माणुस माणसात होता. आता माणुसकी नावाला पण राहिली नाही. असती तर भर दिवसा कोण कोणचा खुन करतो, दोन लग्न करुन हुशार्या मारतो, ३ वर्षे जेलमध्ये राहुन नेता म्हणुन आपल्या बोकांडी बसतो. आपण अश्या लोकांना आमचा नेता, आमचा दादा, भाऊ म्हणुन रस्त्यावर उतरतो हीच आपली किंमत ठरलेली आहे. चुक ला चुक, बरोबर ला बरोबर बोलण्याची धमक आपली कधीच मरुन गेलेय. आपली ही अवस्था आहे. आपली मुलं आपल्या नंतर अजुन किती गुलामी करतील याचा विचार हा लेख वाचणार्या प्रत्येक वाचकाने करावा. चूक की बरोबर?
मुलांना जुन्या काळातील लोकांप्रमाणे चुकीला चुक व बरोबरला बरोबर बोलण्याची सवय, शिस्त पुढच्या पिढीला लावणे गरजेचे आहे तरच आधुनिक काळात देखील आपण त्याच सन्मानाने जगु शकू. गेल्या १५ वर्षाचा फक्त राजकारण या विषयाचा अभ्यास केला तर आपण फक्त ऑफीस, काम, ताण - तणाव, मुलांचे शिक्षण, रोज नवीन समोर येणारा वाद व त्यामागे जाणारा आपला वेळ या पलीकडे जावून आपण जीवनात काही करत नाही. राजकीय लोक याचा फायदा घेऊन सत्ता उपभोगत आहेत. विरोधी पक्ष पण सत्ताधारी पण मग आपण नक्की करतो काय? हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या एका लेखाने समाजाचे विचार, समाज तर बदलु शकत नाही पण जे कोणी वाचतील त्यांना नक्की चुक काय बरोबर काय हे समजले तरी पुढची आपली पिढी व भविष्य सुरक्षित राहील याची खात्री मला वाटते... चूक की बरोबर?
धन्यवाद!
अभिप्राय