पाककला | Maharashtrian Recipes

टोमॅटो भात | Rice Recipes

साहित्य :

२ वाट्या तांदूळ, २५० ग्रॅम टोमॅटो, २ चमचे तूप, ४ लवंगा, १ कांदा, १ वाटी ओले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, ४-५ लसूणपाकळ्या, १ इंच आले, २ दालचिनीचे लहान तुकडे, ८-१० काळी मिरी, १ लिंबू, २ चमचे मीठ ( किंवा जास्त), १ चमचा साखर

 

कृती :

तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावेत. टोमॅटो बारीक चिरून ४ वाट्या पाण्यात शिजवावेत. पुरणयंत्रावर पाण्यासकट गाळून घ्यावे. भाताच्या पातलेल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, काळीमिरी, दालचिनी घालून कांदा परतावा. एकीकडे आले-लसूण वाटून घ्यावे. मिरच्या उभ्या चिराव्या. कांदा लालसर झाला की तांदूळ परतावेत व वाटलेली गोळी व मिरच्या घालावे. मीठ व साखर घालावी. गाळून घेतलेले टोमॅटोचे पाणी घालावे. मंद आंचेवर भात शिजवावा. वाढताना त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. जास्त आंबट आवडत असेल त्यांच्यासाठी लिंबाची फोड द्यावी.

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.