माझा बालमित्र | Majha Balmitra

गरुड आणि घुबड

Isapniti Katha

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली; व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, `गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,' गरुड म्हणाला, `खरेच, तुझी पिल्लें कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.' घुबड म्हणाले, `ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, शब्द सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.'

पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ` किती घाणेरडी , कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.' असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !

आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, `गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.' गरुड म्हणाला, `मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?'

तात्पर्य:- स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटांत पाडून घेतो.

इसापनीती कथा भाग १

 

  • मोलकरीण आणि कोंबडी
  • पारधी आणि पारवा
  • लहान मासा आणि मोठा मासा
  • कोल्हा आणि वानर
  • कुत्रा आणि लांडगा
  • तारवावरील दोन प्रवासी
  • दोन कोंबडे
  • भविष्यवादी
  • चतुर स्त्रा
  • प्रवासी आणि ज्योतिषी
  • कवडा आणि कोंबडे
  • कोल्ही आणि सिंहीण
  • धनगर व्यापारी झाला होता
  • देव आणि नास्तिक मनुष्य
  • वैद्य आणि रोगी
  • निराश झालेले कोळी
  • मनुष्य आणि त्याचा लाकडी देव
  • गरुड पक्षी आणि मनुष्य
  • शेतकरी आणि त्याचे मुलगे
  • खंडोबा आणि मधमाशी
  • लोहर आणि त्याचा कुत्रा
  • लांडगा आणि सिंह
  • सिंह आणि बैल
  • गप्पीदास
  • खंडोबा आणि प्रवासी

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.