सुविचार कोष भाग - ९

Suvichar | Marathi Good Thoughts

टीका करणार्‍या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणार्‍या मित्रांपासून सावध रहा.

- मराठीमाती सुविचार कोष

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.

- मराठीमाती सुविचार कोष

मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

- मराठीमाती सुविचार कोष

भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.

- मराठीमाती सुविचार कोष

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

- मराठीमाती सुविचार कोष

त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

- मराठीमाती सुविचार कोष

शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.

- मराठीमाती सुविचार कोष

कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

- मराठीमाती सुविचार कोष

बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.

- मराठीमाती सुविचार कोष

दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

- मराठीमाती सुविचार कोष

ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.

- मराठीमाती सुविचार कोष

दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

- मराठीमाती सुविचार कोष

जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

- मराठीमाती सुविचार कोष

एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

- मराठीमाती सुविचार कोष

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

- मराठीमाती सुविचार कोष

श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

- मराठीमाती सुविचार कोष

राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

- मराठीमाती सुविचार कोष

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

- मराठीमाती सुविचार कोष

असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.

- मराठीमाती सुविचार कोष

उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

- मराठीमाती सुविचार कोष

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

- मराठीमाती सुविचार कोष

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.

- मराठीमाती सुविचार कोष

पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

- मराठीमाती सुविचार कोष

मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

- मराठीमाती सुविचार कोष

दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.

- मराठीमाती सुविचार कोष