माझा बालमित्र | Majha Balmitra

सुविचार | Suvichar | Marathi Good Thoughts

सुविचार - ५१ ते ७५

  • ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
  • ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
  • ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
  • ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
  • ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
  • ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
  • ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.
  • ५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
  • ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
  • ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
  • ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!
  • ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
  • ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
  • ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
  • ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
  • ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
  • ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
  • ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
  • ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
  • ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
  • ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
  • ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
  • ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
  • ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.