Aksharmanch

नातं

हर्षद खंदारे

जगण्याच्या शर्यतीत कसा-बसा

धावत-धडपडत

धापा टाकतं..

उपान्त्य फेरीत मी!

तेव्हढ्यात

पांढऱ्या गर्दितून एक नातं आडवं गेलेलं,

घाबरलेल्या अपशकूना सारखं

आणि आयुष्य..

निर्वीकारपणे माघारी बुरसटलेल्या पाच पावलान सारखं!

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.